कुडाळ
विजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने रत्नागिरी परिमंडल कार्यालयांतर्गत ३१ हजार १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीज जोडणी घेण्याची संधी ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेत रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील ७८७ लघुदाब व उच्चदाब वीज ग्राहकांनी ६५ लाख ८० हजारचा भरणा करत आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५४० ग्राहकांनी ५२ लाख ८६ हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४७ ग्राहकांनी १२ लाख ९४ हजार रुपयांचा भरणा केला आहे, अशी माहिती कोकण विभाग जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जिल्ह्यातील ११ हजार ८२० ग्राहक ‘अभय’ योजनेसाठी पात्र महावितरणने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ३० हजार ३४८ ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवण्याची संधी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार ५२९ वीज ग्राहक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार ८२० ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. या योजनेच्या जनजागृतीत जनमित्र अर्थातच वायरमन यांचे महत्वाचे योगदान आहे. ग्राहकांच्या शंकेचे निरसन केल्याने ते थकीत वीज बिल भरत आहेत. जनमित्र गावागावांत प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना या योजनेची माहिती व महत्व पटवून देत आहेत.जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कमभरावी लागणार आहे. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे.’अभय’ योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीज ग्राहकांसाठी महावितरण ‘अभय’ योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेवटचे १२ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.










