

५ वर्षांखालील आपल्या मुलाला राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, हे प्रत्येक पालकाचे एक निरोगी आणि सशक्त भारत घडवण्याच्या दिशेने असलेले महत्त्वाचे योगदान आहे. पोलिओविरुद्धचा लढा ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
आज ‘राष्ट्रीय पोलिओ दिना’चे औचित्य साधून, मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’चा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत, जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा (ASHA) व अंगणवाडी सेविका आणि कणकवलीतील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत ५ वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
‘पोलिओ-मुक्त भारत’ हे यश टिकवून ठेवण्यासाठी जन-जागृती, नियमित लसीकरण आणि प्रत्येक मुलापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे ही काळाची गरज आहे. जेव्हा प्रत्येक मूल निरोगी असेल, तेव्हाच भारताचे भविष्य अधिक सक्षम आणि सुरक्षित होईल.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, कणकवलीचे नगराध्यक्ष संदीप पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, ज्येष्ठ नागरिक अशोक करंबळकर व गणेश काटकर, तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.












