जिल्ह्यात ड्रग्ज विळखा ; ७ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव,पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद

रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विळखा वाढत असून, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या प्रकरणातील सात जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. यावेळी पोलीस दलाला ड्रग्जबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. राज्यासह जिल्ह्यातही ड्रग्जचा विळखा वाढत आहे. तरुण पिढी यात मोठ्या प्रमाणात गुरफटत असल्याचे दिसून येत आहे.ड्रग्जविरोधात पोलीस दलाने तीव्र मोहीम राबवावी. यात विक्री प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून, यातील सात जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.