“आ. प्रमोद जठारांच्या पाठपुराव्याला यश? ग्रामविकास कामांना मिळणार चालना”

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या विविध कामांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करून विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकास कामांना गती मिळणार आहे.