श्री शिवराज राठोड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे गावात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेकविध अभियानामध्ये किंजवडे ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. श्री शिवराज राठोड यांच्या अचूकता, गुणवत्ता आणि वेग या त्रिसूत्रीवर भर देऊन काम करण्याचे हे फलित आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
पंचायत विकास निर्देशांक 1.0 मध्ये ग्रामपंचायत किंजवडे ला राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासनाचे मंत्री श्री. ना. जयकुमार गोरे साहेब, प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन श्री. एकनाथ डवले (भा.प्र.से.), तसेच उपमहासंचालक तथा संचालक, राज्य ग्रामविकास संस्था (यशदा, पुणे) डॉ. मल्लिनाथ कळशेट्टी साहेब यांच्या हस्ते, पुणे येथे श्री. शिवराज राठोड (ग्रामपंचायत अधिकारी, सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले










