कोकणशाही

कोकणशाही

हुंबरट तिठ्यावर अपघात ; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जाणाऱ्या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमन गणी खतिक (२२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा…

२०२६ या नववर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील तमाम बंधू – भगिनींनो,गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२५ हे वर्ष आता सरत आलंय, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवणारे २०२६ साल आपल्याला खुणावत आहे. आपण सर्वजण नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे…

देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती निवड जाहीर

देवगड : या निवडणुकीत स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी, पाणी पुरवठा सभापतीपदी सौ. तन्वी चांदोस्कर, बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सौ. मनीषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. देवगड | देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या विषय…

‘हाउसफुल्ल’, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे सज्ज!

रत्नागिरी दापोली : नाताळ व नववर्षाच्या सलग सुट्ट्या, थंड व आल्हाददायक हवामान आणि निसर्गसौंदर्याची भुरळ यामुळे दापोली तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. तालुक्यातील प्रमुख समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे सध्या अक्षरशः ‘हाउसफुल्ल’ झाली असून पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस…

टेरव येथे बिबट्याची दहशत, नागरिकांनी सतर्क राहण्याचे सरपंचांचे आवाहन

चिपळूण – टेरव : आवश्यक खबरदारी घेण्याचे सरपंच किशोर कदम यांचे आवाहन चिपळूण तालुक्यातील टेरव परिसरात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन टेवचे सरपंच किशोर कदम यांनी केले आहे.टेरव गाव जंगलालगत…

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

कणकवली जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय ८३, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी रविवार 28 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,…

मुंबईत 5 वर्षांत ‘एवढ्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

मुंबई पोलीस दलात शिस्तभंग आणि गंभीर प्रकरणांबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांत विविध कारणांमुळे एकूण 58 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी 53 अधिकाऱ्यांना चौकशीअंती पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले…

महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट कळसुबाई शिखर गिर्यारोहण क्षेत्रात कणकवलीतला चिमुकला शोभित प्रशांत कासलेची गिर्यारोहकाची मोठी झेप

कणकवली : वयाने अगदी लहान, पण जिद्द आणि धाडसाने मोठा ठसा उमटवत कलमठ बाजारपेठ शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी शोभित कासले याने ‘महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर यशस्वीरीत्या सर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६४६ मीटर…

रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाची आणि निर्णायक कारवाई केली आहे. 2020 ते 2025 या कालावधीत विविध 65 गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल 181 किलोपेक्षा अधिक अमली पदार्थांचा साठा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव…

पिंगुळी येथे भरधाव कारची दोन दुचाकीस्वारांना धडक ; दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मुंबई–गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदिरासमोर शनिवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने समोर चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. पहिल्या धडकेत एक मोपेड…