Category बातम्या

🚆 गणेशोत्सव तोंडावर; सावंतवाडी रेल्वे थांब्याचा निर्णय अजूनही रखडला!

सावंतवाडी : रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देऊनही सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास कोकण रेल्वेकडून होत असलेल्या विलंबाविरोधात जागरुक नागरिक आक्रमक झाले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचे हाल टाळण्यासाठी रेल्वेने या थांब्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी नागरिकांनी…

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या ज्येष्ठ बंधूंचे दुःखद निधन; परिसरात शोक

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी चिंदरकरवाडी येथील प्रकाश गणपत तोरसकर (वय ५९) यांचे बुधवारी सायंकाळी पिंगुळी येथील निवासस्थानी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.गेले काहीवर्ष ते आजारी होते. चार दिवसापूर्वी त्यांना गोवा बांबुळी…

💐 वेंगुर्ल्याने गमावले अभ्यासू नेतृत्व; माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल काळाच्या पडद्याआड

वेंगुर्ले : येथील माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शिवाजी रमाकांत कुबल यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. ते कुबलवाडा येथील रहिवासी होते.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कुबल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष…

🌊 तिलारी धरणातून उद्यापासून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ जुलै २०२६ पासून नियमानुसार अतिरिक्त पाणी तिलारी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व…

⚡ सावडाव धबधब्यावर तुफान राडा! कर्मचाऱ्यांना मारहाण, ग्रामस्थांवर दगडफेक, एक पर्यटक ताब्यात

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा येथे पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सावडाव ग्रामपंचायतीकडून धबधब्याकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे दहा रुपये पर्यटन कर घेतला…

😟 देवगडकरांना मोठा धक्का! देवगड-बोरिवली बसफेरी अचानक बंद

देवगड : देवगड-बोरिवली ही नियमित बसफेरी गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होतेय. कमी भारमानामुळे ही बस सद्यस्थितीत बंद केल्याची माहिती आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी दिली असून ऑगस्टमध्ये ही ती पूर्ववत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.…

देवगडचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या सहायक वेबमास्टरपदी निवड

देवगड : राज्यस्तरीय पदावर निवड झालेले महाराष्ट्रातील सर्वात तरुण अस्थिरोगतज्ज्ञ; देवगडच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी.देवगड मेडिकल फाउंडेशनचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तन्मय सुनील आठवले यांची प्रतिष्ठित महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या सहायक वेबमास्टरपदी तसेच कार्यकारी समिती सदस्यपदी निवड झाली आहे. अत्यंत कमी वयात महाराष्ट्रातील…

महिला व्यावसायिकांसाठी रोजगार व शासकीय योजनांवर मार्गदर्शन शिबिर; २३ जुलै रोजी कणकवलीत आयोजन

संजय पेटकर | कणकवली कणकवली तालुका व्यापारी संघाशी संलग्न महिला व्यावसायिक संघटना, कणकवलीची नुकतीच स्थापना करण्यात आली असून, महिला उद्योजिका आणि व्यावसायिकांना व्यवसायात अधिक सक्षमपणे कार्य करता यावे तसेच आधुनिक व्यावसायिक आव्हाने, संधी आणि शासकीय योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने…

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षमित्र लेखक श्री. प्रकाश काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात सन 2015 साली महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये नक्षत्रवनप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड देशासाठी” या उद्देशाने निसर्गरम्य वातावरणामध्ये महाविद्यालयात 268 हून अधिक नक्षत्र वनामध्ये झाडे लावण्यात आली. सुंदर पर्यावरण…

🌧️ मुंबईकरांना मोठा दिलासा! अवघ्या दोन दिवसांच्या पावसाने तलावसाठ्यात विक्रमी वाढ

मुंबई : तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात होणारी घट थांबली असून आता पुन्हा पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसात ४७ हजार ४७९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ५४ टक्केच्या वर…