कोकणशाही

कोकणशाही

नदीतील वाळू-दगड उपशावर कारवाईची मागणी; तलाठी कार्यालयासमोर उपोषण

सावंतवाडी : माडखोल मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय समोर ग्रामस्थांकडून आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. तेरेखोल नदीपात्रातील माडखोल, सांगेली, कलंबिस्त, ओटवणे, इन्सुली या भागात गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतील गौणखनिज उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण छेडले आहे.वाळू, दगड, गोटे,…

सिंधुदुर्गची राज्यात दमदार झेप! मतदार मॅपिंगमध्ये दुसरे स्थान

सावंतवाडी : निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याने मतदारांच्या डिजिटल मॅपिंगमध्ये ९१ टक्के टप्पा पूर्ण करून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सुरुवातीला संथ गतीने चाललेल्या या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः आढावा घेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील…

मुंबईत ४० अंशांची जाणीव, कोकणात मेघगर्जनेसह सरींचा अंदाज

मुंबई: असह्य उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झालेले असतानाच या उकाड्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या, बुधवारपर्यंत मुंबई तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईमध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रांवर…

🚤 “लाकडी बोटींना मिळणार इलेक्ट्रिक शक्ती!”; पालकमंत्री नितेश राणेंचा हरित जलवाहतुकीकडे मोठा निर्णय

मुंबई : वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना देण्यासाठी जुन्या लाकडी बोटींचे टप्या-टप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला या उपक्रमासाठी बोट मालकांना…

नांदगाव ओटव फाटा अपघात ठरला जीवघेणा; पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही झुंज अपयशी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा येथे शनिवार, ९ मे रोजी सकाळी झालेल्या कार अपघातातील जखमी चालक सचिन भास्कर सावंत (५०, रा. विक्रोळी, मूळ रा. हिर्लोक) यांचेही कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातात त्यांच्या…

देवगड समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; चैतन्यचा मृतदेह अखेर सापडला

देवगड तालुक्यातील तारामुंबरी-बागवाडी समुद्रात पोहताना बेपत्ता झालेल्या चैतन्य राजाराम गुरव या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर आज सायंकाळी मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळून आला.या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देवगड परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईतील…

संसदरत्न २०२६’साठी महाराष्ट्राच्या खासदारांची दमदार निवड; आमदार निलेश राणेंकडून अभिनंदन!

मुंबई : संसदरत्न २०२६’ पुरस्कारासाठी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे, खासदार मा. नरेशजी म्हस्के तसेच भाजपा खासदार मा. डॉ. हेमंतजी सवरा, खासदार मा. मेधाताई कुलकर्णी आणि खासदार मा. स्मिताताई वाघ यांची झालेली निवड अभिमानास्पद आहे.आमदार निलेश राणेंनी…

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० वर्षांचा गौरवशाली प्रवास; प्रसन्ना देसाई यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच वेंगुर्लावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वेंगुर्ला नगरपरिषद ही कोकणातील ऐतिहासिक आणि लोकाभिमुख संस्था असून शहराच्या विकासात तिचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा,…

कोकिसरे रेल्वे फाटकावरील समस्या कायम; भुयारी पुलाची प्रतीक्षा लांबली

वैभववाडी : गेली तीन वर्षे सुरू असलेले कोकिसरे येथील रेल्वे भुयारी पुलाचे काम आणि दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांचे काम अद्यापही संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भुयारी पुलाचे मुख्य बांधकाम पूर्णत्वास आले असले…

“गोवंश संरक्षणासाठी सिंधुदुर्गात कडक पावले; पालकमंत्री नितेश राणेंची उच्चस्तरीय बैठक”

महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक, गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाbअबाधित राखण्याबाबत मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र…